Thursday 23 July 2015

भाषा शिक्षण

नमस्कार मित्रमैत्रिनींनो,
मुलांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी आपण उपक्रम, प्रात्यक्षिक, भाषिक खेळ, शब्दकोडी, विनोद घेत असतो.

पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जावून आपण इतर पुरक
साहित्य वापरू शकतो.
वर्तमान पत्रे,मासीके यातही खूप काही शिकायला मिळते.शिवाय अवांतर वाचनाची सवयही लागेल.

अवांतर वाचन ज्या मुलांचे चांगले असेल त्या मुलांचे पुर्वज्ञान चांगले असते.त्यामुळे अशा मुलांना आशयाचे आकलन सहज होते.याचा अनुभव मला इयत्ता तिसरी ला परीसर अभ्यास विषय शिकवताना आला.

भाषिक कौशल्यांचा विकास झाला की भाषासमृद्धी तर होतेच पण इतर विषयासाठी पण खूप फायदा होतो.

चला तर वाचन संस्कृती वाढवू.

No comments:

Post a Comment