Tuesday 22 September 2015

शिकणं अन् जगणं

दुपारच्या सुटीची वेळ  ......
मुलं खिचडी घेण्यासाठी जावू लागलेत.
तेवढ्यात आमचे मुख्याध्यापक म्हणाले सर बघा बघा बाहेर जरा........
" हे खरं शिक्षण "
मी बाहेर पाहतोय तर माझ्याच वर्गातील संस्कार हा मुलगा एका म्हाताऱ्या आजीला घेऊन चाललेला दिसला.मला ते खुपच भावलं तो आदराने, त्या आजीला घेऊन चालला होता.
त्याच्या सोबतचा त्याचा मित्र त्या आजीला रिक्षात  जागा पडण्यासाठी पुढे गेला होता.
मला त्या दोघांचे खुपच कौतुक वाटले.
शाळा भरल्यावर सर्व मुलांना तो प्रसंग व त्याचे प्रशंसनीय कार्य सांगीतले.सर्व मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
त्या आजीने त्या मुलांना ....
"परिक्षेत पास होताल"
असा आशिर्वाद दिला होता.
पण
ते जीवनाच्या परिक्षेत पास झाले होते.
कारण
शिकणं जगण्यात आलं होत.मला त्यांचा खुपच अभिमान वाटला.
समानुभूती हे जीवनकौशल्य अन् संवेदनशीलता हे मूल्य मूलांमध्ये आपसूकच रूजलं....
याचाही आनंद झालाच.
वर्गशिक्षक म्हणून मुलं समजून घेण्याची ही निरंतर प्रक्रिया आनंददायी आहे.

No comments:

Post a Comment