कविता
कविता मुलांच्या भावविश्वात पटकन प्रवेश करतात.कविता वाचून,कविता संकलन, कविता गायन,कविता लेखन मुलांना खूप आवडते.
भाषा विषयातील 1) साहित्याचा आस्वाद 2) स्वअभिव्यक्तीचे प्रयत्न क्षमताक्षेत्राच्या विकासासाठी कविता खूप महत्वाच्या आहेत.
मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी कविता खूप छान माध्यम आहे.
प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे, नामदेव माळी यांनी
शाळेतील मुलांच्या कवितांचे कवितासंग्रह प्रकाशीत केले आहेत.
कवितेसाठी बालभारती चे किशोर मासीक खूप छान पूरक वाचन साहित्य आहे.
मुलांच्या भाषा समृद्धिसाठी अशा बाबी आपण समजून घेऊया.
No comments:
Post a Comment